27 July 2023

मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. या अनुषंगाने अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत मा. केंद्रीय कॅबिनेट सचिव यांचेद्वारे सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची दि. २२.०७.२०१३ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेवून काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या, याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत. या उपक्रमानुसार प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेणे अपेक्षित आहे. या अभियानात ग्रामपंचायती, पंचायत समित्या जिल्हा परिषदा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देणे अभिप्रेत आहे.

या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


अ. ग्रामपंचायत स्तर

दिनांक ९ ते १४ ऑगस्ट २०२३ यादरम्यान कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करणे.

१) शिलाफलक :

गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर /शाळा/ ग्रामपंचायत इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी. (शिलाफलकाची डिझाईन सोबतच्या सादरीकरणामध्ये दिली आहे.) •शिलाफलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा विजन २०४७ संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे (नावे उपलब्ध नसल्यास "मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरीता बलिदान दिलेल्या वीरांना शतश: नमन । "असे सामान्य वाक्य लिहावे, ग्रामपंचायतचे

नाव, दिनांक याबाबी नमूद करायच्या आहेत. ) शिलाफलकमची निर्मिती मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी.

शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यसाठी व

सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी.

शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यसाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी.
२) वसुधा वंदन

• यामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात यावी.

-यासाठी रोपे खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात यावा.या उपक्रमासाठी आवश्यक रोपे उपलब्धताबाबत खात्री करावी. 
३) स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा, (आर्मी, पोलीस दल), स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान (शाल,बुके, शिफळ देवून) करण्यात यावा.

४) पंच प्रण ( शपथ घेणे

सोबतच्या सादरीकरणामध्ये दिल्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी (PRI),गावकऱ्यांनी पंच प्रण (शपथ) घेण्यात यावी.

• हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या
दिव्यांची पुरेशी व्यवस्था करावी, सदरील दिवे रास्तधान्य दुकानातही खरेदीसाठी उपलब्ध करून दयावेत.

(५) ध्वजारोहन कार्यक्रम: -गाव क्षेत्रातील (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इ.) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत

गायन व तिरंगा फडकविणे. संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी (PRI), युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करणे,

- या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १-२ मूठ माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपवावी. - या सर्व उपक्रम राबविणेबाबत कृती आराखडा कार्यक्रमाआधी विशेष ग्रामसभा घेवून याबाबतचा ठराव करण्यात यावा.
-१५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे नियमित झेंडावंदन असेल.

ब. तालुका स्तर: 

दिनांक १६ ते २० ऑगस्ट २०२३ यादरम्यान पुढील उपक्रम आयोजित करणे.

(१) माती कलशामध्ये गोळा करणे

प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटकरून किंवा रेडियमने लिहावे.

हा मातीचा कलश दिनांक २७ ते ३० ऑगस्ट २०२३ यादरम्यान मा. प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करावी. याकरीता नेहरू युवा केंद्र,

युवक कल्याण विभागाचे सहाय्य घ्यावे.
२) वसुधा वंदन

-यामध्ये तालुक्याचे योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून

अमृतवाटिका करण्यात यावी. - यासाठी रोपे खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून

करण्यात यावा.

३) ध्वजारोहन कार्यक्रम

- तालुकास्तरावर (अमृत सरोवर शाळा/ पंचायतसमिती इ.) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन

राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविणे.

- संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व

नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करणे.


08 June 2023

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित निधी अंतर्गत स्वच्छता विषयक कामांचा समावेश ग्राम विकास आराखड्यात करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:-



केंद्र शासनाने पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत ग्राम पंचायतींना वितरीत करण्यात येणाऱ्या निधी पैकी ६०% इतका निधी बंधित स्वरूपात ठेवला असून सदर निधी पैकी निम्मा निधी म्हणजेच ३०% स्वच्छता संबंधित उपांगावर व उर्वरित निम्मा निधी म्हणजेच ३०% पिण्याच्या पाण्याच्या योजनांसंबंधित उपांगासाठी वापरण्याबाबत निर्देश दिले आहेत. तथापि, राज्यातील ग्राम पंचायत पातळीवर पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित निधीच्या अनुषंगाने योग्य पध्दतीने नियाजन न केल्यामूळे पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा बंधित निधी खर्च करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा या योजनेच्या अंमलबजावणीवर हो आहे. सबब, राज्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
(I) केंद्र शासनाने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येणाऱ्या निधी पैकी ६० टक्के निधी बंधित स्वरूपात ठेवला असून सदर पैकी निम्मा निधी म्हणजेच ३० टक्के स्वच्छतासंबंधीत उपांगावर व उर्वरित निम्मा निधी म्हणजेच ३० टक्के पिण्याच्या पाण्याच्या योजनांसंबंधित उपांगासाठी वापरण्याबाबत निर्देश दिले आहेत. तरी, केंद्र शासनाने स्वच्छता व पिण्याच्या पाण्यांच्या योजनांसाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत बंधित केलेल्या निधीपैकी, स्वच्छता विषयक बाबींसाठी असलेला ३०% बंधीत निधी, गावात घेण्यात येणाऱ्या / आलेल्या ज्या उपांगावर / कामांवर खर्च करावयाचा आहे, त्या कामांचा / उपांगांचा समावेश सन २०२३ - २४ च्या आराखड्यात असल्याशिवाय, त्या-त्या स्तरावर १५ या केंद्रीय वित्त आयोगाच्या GPDP / BPDP/DPDP आराखड्यांना मंजूरी देण्यात येऊ नये. जेथे अगोदरच आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे, त्या प्रकरणांमध्ये जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी याबाबत खातरजमा करुन घ्यावी व आवश्यकतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मान्यतेने आराखड्यात सुधारणा करण्यात यावी.
(II) पाणी पुरवठ्यांच्या योजनांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध •असल्याने, तसेच ज्या गावांमध्ये आता पाणी पुरवठ्याशी संबंधित कोणतीही कामे १५ वा वित्त केंद्रीय आयोगाच्या निधीमधून घेण्यासाठी शिल्लक नाहीत, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्यांच्या योजनांसाठी बंधित असलेल्या ३०% हिस्स्याच्या निधीचा विनियोग स्वच्छताविषयक कामांवर करता येईल, त्यासाठी अशी सर्व कामे देखील सन २०२३-२४ आराखड्यात घेण्यात यावीत.
(||) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी स्वच्छता विषयक प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांच्या एकूण अनुज्ञेय रकमेपैकी, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा ॥ च्या मार्गदर्शक सूचनानुसार, ७०% निधी स्वच्छ (भारत अभियान (प्रा.) टप्पा आणि ३०% निधी १५ वा वित्त आयोगाच्या निधीमधून खर्च करणे अनिवार्य आहे, अशा कामांकरिता तरतूद करण्यात आलेला १५ वा केंद्रीय वित्त आयोगाचा ३०% बंचित निधी, संबधित ग्रामपंचायतींना अन्य बाबीवर खर्च करता येणार नाही याबाबतची दक्षता जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी घ्यावी. सदर बाबींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास, शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. संबंधितांवर
(IV) वरील मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे, अशा कामांची देयके कंत्राटदारास अदा करताना, १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या ३०% निधी अनुषंगाने देयके अदा करताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणारा नाही, याची दक्षता संबंधित ग्रामपंचायतीनी घेणे आवश्यक आहे. सदर देयके अदा करण्याच्या अनुषंगाने, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांनी त्यांच्या स्तरावर वेळोवेळी आढावा घ्यावा व त्यानुषंगाने जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा.
(V) जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत खर्च करण्याच्या अनुषंगाने सदर कामांचा स्थानिक गरजेनुसार त्या त्या स्तरावरील आराखडयात समावेश करणे बंधनकारक राहील. GPDP आराखडे बनविताना बंचित निधी अंतर्गत कोणकोणत्या घटकांचा सामावेश करण्यात आलेला आहे. याबाबत केंद्राच्या मार्गदर्शक सूचना व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा दिनांक १९ नोव्हेंबर २०२० व दिनांक २ डिसेंबर, २०२१ रोजीचा शासन निर्णय निदर्शनास आणून त्याबाबतची माहिती सरपंच, VWSC सदस्य आणि ग्रामसेवकांना देणे बंधनकारक, राहिल.
(V)] १५ च्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित निधीमधून झालेल्या कामांच्या व खर्चाच्या नोंदी केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर घेण्याची जबाबदारी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. त्यानुषंगाने १५ व्या केंद्रीय वित्त आयोग बंधित निधीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या कामांची भौतिक आणि आर्थिक प्रगती ई-ग्रामस्वराज्य या संकेतस्थळावर वेळोवेळी नोंदविण्याच्या सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यंत्रणेला देण्याची दक्षता जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी घ्यावी.
VII)जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी १५ व्या केंद्रीय वित्त आयोग बंधित निधी अंतर्गत झालेल्या कामांची आणि झालेल्या खर्चाची माहिती दर महिन्याला राज्य पाणी व स्वच्छता मिशन, बेलापूर, नवी मुंबई यांना देणे बंधनकारक राहिल. ज्यामुळे वेळोवेळी प्रगती पाहणे आणि कामांचे संनियंत्रण करणे शक्य होईल.
(VIII) तसेच, गावांतील सर्व एक खड्डा शौचालयांचे रुपांतर दोन खड्डयांच्या शौचालयांमध्ये करणे तसेच शोषखड्डा नसलेल्या सेप्टीक टँकच्या शौचालयांना शोषखड्डा करणे या सर्व • कामांचा समावेश सन २०२३-२४ च्या GPDP आराखड्यांमध्ये केल्यानंतरच त्या-त्या स्तरावर आराखड्यांना मंजूरी देण्यात यावी. जेथे अगोदरच आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे, त्या प्रकरणांमध्ये जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी याबाबत खातरजमा करुन घ्यावी व आवश्यकतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मान्यतेने आराखड्यात सुधारणा करण्यात यावी.
 (IX) आराखड्यात समाविष्ट सर्व शौचालयांची दुरूस्ती (Retrofitting of Toilets) कामे दि. ३०. जून २०२३ अखेर पूर्ण करण्यात यावीत. कामांच्या आणि झालेल्या खर्चाच्या नोंदी केंद्र शासनाच्या संबंधित संकेतस्थळावर घेण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायतींची राहील. याबाबतची तपासणी जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी करावी..
(x) गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांनी आपल्या तालुक्यातील १०० टक्के शौचालयांची दुरुस्ती (Retrofitting Of Toilets) कामे विहीत मुदतीत पूर्ण करुन घ्यावीत तर यांवर सनियंत्रण उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत / पा व स्व.) यांचे राहील.
(XI) ज्या ग्राम पंचायतीचे ग्राम विकास आराखडे तयार झाले आहे. तथापि सदर आराखड्यात •बंधित निधी अंतर्गत मान्य कामे सामाविष्ट केले नसल्यास सदर आराखडे शासनाने दिलेल्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून अद्ययावत करण्याबाबत आवश्यक कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी तातडीने करावी.
(XII) ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सदस्यांना ग्रामविकास आराखडा (GPDP) तयार करण्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत व सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक निधी हा जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान (ग्रा) अंतर्गत क्षमता बांधणी या घटकांतर्गत खर्च करण्यास अनुज्ञेय आहे, याची सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंद घ्यावी व त्याप्रमाणे प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत.
XIII) उपरोक्त सुचनांप्रमाणे ग्राम विकास आराखडा (GPDP) तयार करून घेण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी हि संबंधित जिल्हा परिषदेच्या जिल्हा समन्वयक ( स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांची राहिल. तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीची नोंद संबंधित जिल्हा समन्वयक (स्वच्छ भारत अभियान) तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांच्या गोपनिय अहवालात घेण्यात यावी.
. तरी, उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता सर्व संबंधित ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी घ्यावी. तसेच, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) व पंधरावा वित्त आयोग यांची सांगड घालून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी करावा.



06 June 2023

शासकीय विभाग/संस्थाकडून वस्तु व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) हे पोर्टल विकसित केले आहे त्याद्वारे खरेदी करणेबाबत

प्रिय श्री/श्रीम.

केंद्र शासनाने विकसित केलेल्या गव्हर्नमेंद्र ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची कार्यपध्दती, राज्य शासनास वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी मान्यता उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५ /उद्योग-४ दि. २४.०८.२०१७ अन्वये स्वीकृत केली आहे.

केंद्र शासनाने राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत (National Public Procurement policy) खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणत बदले केले आहेत. शासकीय विभाग/संस्थाकडून वस्तु व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) हे पोर्टल विकसित केलेले आहे. GeM पोर्टलवर खरेदी करताना खरेदीदार विभागाच्या गरजेनुसार निविदा फार्म, वस्तुनिहाय विर्निर्देशामध्ये बदल करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध असून, पोर्टलव्दारे राबविण्यात येणारी खरेदी पध्दती ही मानवी हस्तक्षेपाशिवाय असून संपूर्णत: ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. यामुळे, खरेदी कार्यपध्दतीत पारदर्शकता येऊन नेमक्या व योग्य नामांकित दर्जाच्या वस्तुंचा पुरवठा वाजवी किंमतीत उपलब्ध होणार आहे. गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलच्या वापरामुळे शासकीय विभागाव्दारे होणाऱ्या खरेदी प्रक्रियेच्या कालावधीमध्ये बचत, उत्कृष्ठ वस्तूंचा पुरवठा, वाजवी किंमत व संपूर्ण खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे.

ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थाव्दारे खरेदी केल्या जाणाऱ्या नेहमीच्या वस्तु GeM वर सहज उपलब्ध आहेत. eGS GeM पोर्टलवर एक तरतूद देखिल समाविष्ट केली आहे. ज्यामध्ये खरेदीदार GeM पोर्टलवर नोंदणीकृत स्थानिक विक्रेत्यांना (शक्यतो त्याच जिल्ह्यातील) प्राधान्य देऊ शकतात जेणेकरुन ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागणी केलेल्या उत्पादनांचे वितरण वेळेवर करता येईल.

भारत सरकार पंचायतीराज मंत्रालय यांनी दिनांक २ मे २०२३ च्या अर्धशासकीय पत्रान्वये राज्यातील सर्व ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांनी वस्तु व सेवा यांची खरेदी GeM पोर्टलवरून करण्याचे निर्देश दिले आहे. आपण त्वरीत GeM पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी यापुढे सर्व खरेदी प्रक्रिया GeM पोर्टलवरून करण्यात याव्यात.




10 November 2022

माझी वसुंधरा अभियान ३.० राबविण्याबाबत

 •पर्यावरणातील वातावरणीय बदलाचे महत्व लक्षात घेता,  निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे.

•पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी "माझी वसुंधरा (माय अर्थ)" हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. जो निसर्गाच्या "पंचमहाभूते" नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती प्रयत्न करण्यात येतात.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित “माझी वसुंधरा अभियान" राज्यामध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरी स्थानिक संस्था व ग्राम पंचायती या स्थानिक संस्थांची पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या योजना प्रभावीपणे व मिशन मोड पध्दतीने राबविण्याची स्पर्धा घेण्यात येते.



•माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षात राज्यामधील ६८६ स्थानिक स्वराज्य संस्थांनी ( अमृत शहरे ४३ नगरपरिषदा २२२, नगरपंचायती १३० व ग्रामपंचायती २९१) नोंदणी करून हे अभियान दिनांक २ ऑक्टोबर, २०२० ते दिनांक १५ एप्रिल, २०२१ या कालावधीत राबविण्यात आले आहे. या अभियानात निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामांचे मुल्यमापन करण्यासाठी १५०० गुण ठेवण्यात आले होते.

माझी वसुंधरा अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे मुल्यमापन (डेस्कटॉप मुल्यमापन) दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते ३१ मे, २०२१ या कालावधीत त्रस्त मार्फत करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संबंधित स्थानिक संस्थेमध्ये प्रत्यक्ष जावून मुल्यमापन करणे शक्य नसल्याने या डेस्कटॉप मुल्यमापनामध्ये ज्या स्थानिक संस्था सर्वोत्तम ठरल्या त्या स्थानिक संस्थांचे आभासी मुल्यमापन (Virtual Assessment) विभागांतर्गत गठित समिती मार्फत करण्यात आले. या मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे विजेते घोषीत करून सर्व विजेत्यांसोबत विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी म्हणजे, दिनांक ५ जून, २०२१ रोजी आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान ऑनलाईन सोहळयात सन्मानित करण्यात आले आहे.


•माझी वसुंधरा अभियान २.० ची सुरवात पर्यावरण दिना दिवशी म्हणजे दिनांक ५ जून, २०२१ रोजी करण्यात आली. या अभियानात दुसऱ्या वर्षात नोंदणी करण्यासाठी (१) अमृत, (२) नगर परिषद, (३) नगर पंचायत, (४) ग्राम पंचायत ०१ व (५) ग्राम पंचायत ०२ असे ०५ गट ठेवण्यात आले होते. माझी वसुंधरा अभियान २:० मध्ये ४०६ नागरी स्थानिक संस्था व ११,५६२ ग्राम पंचायतीनी नोंदणी झाली होती.


•माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी दिनांक १६ एप्रिल, २०२१ ते दिनांक ३१ मार्च, २०२२ एवढा कालावधीत देण्यात आला होता. दिनांक १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत स्थानिक संस्थांनी केलेल्या कामाचे डेस्कटॉप असेसमेंट त्रयस्त यंत्रणे मार्फत करण्यात आले. तर, दिनांक १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत फिल्ड असेसमेंट त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्यात आले. या मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे राज्यस्तरावरील व विभागस्तरावरील विजेते घोषीत करून सर्व विजेत्यांसोबत विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी म्हणजे, दिनांक ५ जून २०२२ रोजी आयोजित माझी वसुंधरा अभियानसन्मान सोहळयात सन्मानित करण्यात आले आहे.


माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्थानिक संस्थांनी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या विविध योजनांची मागील दोन वर्षात प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे झालेली फलनिष्पती विचारात घेवून “माझी वसुंधरा अभियान ३.०” ची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्याची व माझी वसुंधरा अभियान ३.० ची टूलकीट निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.


शासन निर्णय :

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबींचा विचार करून पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या सर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान ३.० हे राज्यातील माझी वसुंधरा अभियानांतर्गत नोंदणी केलेल्या १६,८२४ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यास शासन मान्यता देत आहे. तसेच, माझी वसुंधरा अभियान ३.० करिता स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकसंख्या निहा खालील प्रमाणे गट करून त्यानुसार स्पर्धेची अंमलबजावणी करण्यासही शासन मान्यता देत आहे.


1-सदर शासन निर्णय पाहण्यासाठी या लिंक ल क्लिक करा

2-माझी वसुंधरा३.० Toolkit

जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२ साजरा करणे बाबत मार्गदर्शक सूचना

जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२
●संयुक्त राष्ट्र संघाने २०१३ सालापासून जगभर १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून भारत सुरुवातीपासून यात सहभागी आहे..
●येत्या १९ नोव्हेंबरला २०२२ सालचा जागतिक शौचालय दिन संपन्न होत असून आपण स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत सर्व जिल्ह्यात हा दिन साजरा करणार आहोत
●सध्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु असून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानासाठी राज्यभर ग्रामपंचायती तयारी करीत आहेत.
●वरील दोन्ही अभियांनाना पूरक ठरतील असे निवडक उपक्रम यंदाच्या जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने दिनांक ०३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मोहिमेच्या स्वरूपात आयोजित करण्याचे ठरवले आहे.
●जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने आयोजित या राज्यव्यापी मोहिमेत युनिसेफ आणि त्यांच्या सहकारी संस्थाचा देखील सहभाग असणार आहे.

■■जागतिक शौचालय दिन, १९ नोव्हेंबर २०२२ - उपक्रम तपशील■■■

★एक खड्डा शौचालयांसाठी दुसऱ्या खड्ड्याचे बांधकाम
शौचालयांचा एकमेव असणारा खड्डा भरल्यानंतर ही शौचालये वापरण्यायोग्य राहत नाहीत.
ही शौचालये वापरायोग्य करण्यासाठी त्यातील मैलागाळ काढणे अत्यंत कठीण काम ठरते.
अशी शौचालये शाश्वत स्वरुपात वापरायोग्य राहण्यासाठी दुसऱ्या खड्ड्याची उपलब्धता करून देणे गरजेचे आहे..
या पार्श्वभूमीवर, जागतिक शौचालय दिनाच्या निमित्त्याने एक खड्डा शौचालयांचे दोन खड्डा शौचालयात रुपांतर करण्याचा उपक्रम सर्व जिल्ह्यांनी आयोजित करणे अपेक्षित आहे.
एक खड्डा शौचालयांसाठी दुसऱ्या खड्ड्याचे बांधकाम हा उपक्रम सर्व सर्व जिल्ह्यांनी अधिकाधिक ग्रामपंचायत क्षेत्रात राबवावा आणि एक खड्डा शौचालयांना शाश्वत स्वरुपात वापरता येण्यासाठी सुधारणा करून सुरक्षित करावे.


★★पाचशेहून कमी लोकसंख्येच्या गावात मैलागाळ व्यवस्थापनासाठी चर व्यवस्था ग्रामीण भागात बांधल्या गेलेल्या शौचालयांपैकी सेप्टिक टाकीच्या शौचालयांचे प्रमाण लक्षणीय आहे.
ही शौचालये वापरासाठी शाश्वत स्वरुपात उपलब्ध राहण्यासाठी या शौचालयांच्या टाकीतून नियमित स्वरुपात मैलागाळ उपसा करणे आवश्यक आहे..स्वच्छ भारत मिशनच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार पाचशेहून कमी लोकसंख्येच्या गावात चर तंत्रज्ञान वापरून ही प्रक्रिया करण्याचे सुचवले आहे.
 या पार्श्वभूमीवर, जागतिक शौचालय दिन साजरा करताना पाचशेहून कमी लोकसंख्येच्या जास्तीत जास्त गावात गावात चर तयार करून त्या माध्यमातून मैलागाळ व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे.
 या उपक्रमाच्या माध्यमातून पाचशेहून कमी लोकसंख्येचा गावात मैलागाळ व्यवस्थापनाचे काम पूर्ण करता येणार आहे. जागतिक शौचालय दिन निमित्याने राबवावयाच्या मोहिमेच्या दरम्यान जिल्ह्यांनी अधिकाधिक गावात ही व्यवस्था उभी करावी

★★★नागरी मैलागाळ व्यवस्थापन सुविधेसोबत गावांना जोडण्यासाठी नमुना नियोजन आराखडा
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने ग्रामीण भागातील मैलागाळाचे व्यवस्थापन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाकडे असलेल्या मैलागाळ व्यवस्थापन सुविधेचा वापर करून करण्यासंबंधी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
आपल्या वार्षिक आराखड्यात मैलागाळ व्यवस्थापनासाठी निवडलेल्या गावांसाठी
आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे.ग्रामीण भागातील मैलागाळ व्यवस्थापनासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी गावांना नागरी सुविधा सोबत जोडणे हा एक महत्वाचा पर्याय आहे.

★★ ग्रामीण नागरी समन्वयातून मैलागाळ व्यवस्थापन करण्याच्या प्रक्रियेचा जिल्ह्यांना अनुभव यावा आणि भविष्यात हे काम शक्य असेल तिथे प्राधान्याने करता यावे म्हणून जागतिक शौचालय दिनाच्या निमित्याने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक नागरी मैलागाळ व्यवस्थापन सुविधेसोबत गावांना जोडण्यासाठी नमुना नियोजन आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

★★नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत गाव स्तरावर कुटुंब, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळा, अंगणवाडी, वैद्यकीय केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी शौचालय सुविधा उपलब्ध झालेली आहे.
तथापि, अनेक ठिकाणी ही सुविधा नादुरुस्त असल्यामुळे वापरता येत नाही.हागणदारीमुक्त अधिक दर्जा प्राप्त करताना सर्व स्तरावर ही सुविधा वाप स्थितीत उपलब्ध असणे गरजेचे आहे. सर्वच जिल्ह्यात यासंबंधी अधिक काम करण्याची संधी आहे.जागतिक शौचालय दिन साजरा करताना विविध गावामधून वेगवेगळ्या स्तरावर शौचालये 'नादुरुस्त आहेत त्यांची या उपक्रमांतर्गत स्थानिकांच्या आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने दुरुस्ती करून ती वापरासाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

★★सार्वजनिक शौचालय बांधकामाबाबत
जिल्हयांतर्गत अस्तित्वात असलेली सार्वजनिक शौचालये वापरायोग्य आहेत किंवा कसे तसेच, सदर शौचालयांतील मैला गाळ व्यवस्थापन योग्य प्रकारे होते किंवा कसे, याचा आढावा घेवून, त्यांना वापरण्यायोग्य स्थितीत आणणे.

★★वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईनद्वारे प्राप्त अर्जांवर कार्यवाही करणे
केंद्र शासनाने, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत, ज्या लाभार्थी कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध नाही, अशा कुटुंबांना ऑनलाईनव्दारे वैयक्तिक शौचालय मागण्यासाठी लिंक उपलब्ध करुन दिली आहे. सदर लिंकवर प्राप्त वैयक्तिक शौचालय मागणी अर्जांची पडताळणी करुन, वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने, कार्यवाही करण्यात यावी.प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान
जिल्हयांतर्गत पात्र लाभार्थ्यांना द्यावयाच्या प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदानाबाबत आढावा घेऊन, देय अनुदानतात्काळ अदा करण्यात येईल, यानुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
जागतिक शौचालय दिन आयोजनासंदर्भात जिल्ह्याकडून अपेक्षित कार्यवाही
• सोबत दिलेल्या उपक्रमांच्या दिलेल्या तपशीला संबंधी जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाने बैठकीचे आयोजन करून या उपक्रमांची अंमलबजावणी पद्धती निश्चिती करावी.
• निवड केलेल्या उपक्रमांसाठी ग्रामपंचायतवार कुटुंब, सार्वजनिक, शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी उपलब्ध शौचालय सुविधांची सध्यस्थिती लक्षात घेवून उपक्रमांसाठी तालुकावार ग्रामपंचायतीची यादी निश्चित करावी.
• निवड केलेल्या ग्रामपंचायतींची यादी उपक्रम तपशिलासह पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना पाठवून सहभागासाठी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात.
• जागतिक शौचालय दिनाचे जिल्हा नियोजन पूर्ण झाल्यावर ते विविध समाज माध्यमे आणि
वृत्तपत्रांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करावा.
जागतिक शौचालय दिन निमित्य सुचवलेल्या उपक्रमांच्या संबंधी सविस्तर तांत्रिक टिपण उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
जागतिक शौचालय दिन आयोजनासंदर्भात जिल्ह्याकडून अपेक्षित कार्यवाही
जागतिक शौचालय दिन २०२२ च्या निमित्त्याने गावपातळीवर आयोजित उपक्रमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होण्यासाठी तालुका आणि ग्रामपंचायतवार जबाबदारीचे वाटप करावे.
• जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांच्या सक्रीय सहभागासाठी त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे जागतिक शौचालय दिनाचे जिल्हा नियोजन पाठवावे आणि त्यांच्या सहभागाची निश्चिती करून घ्यावी.
दिनांक ० ३ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान जिल्हा कक्षाने शक्यतेनुसार ग्रामपंचायतींना भेटी देवून उपक्रम सहभागासाठी प्रोत्साहित करावे.
 

09 November 2022



मा. सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व संलग्न याचिकांमध्ये दिनांक १७/०५/२०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार माहे जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२२ मध्ये मुदत संपलेल्या २०५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आता, दिनांक २१/१०/२०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द झालेल्या माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या अशा सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुका घेणे  आहे..

शासनाने महाराष्ट्र अधिनियम क्र.४२, दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ अन्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये सुधारणा केली असून सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासन अधिसूचना क्र.७१, । , दिनांक ५ मार्च २०२० अन्वये पुढील पाच वर्षाकरीता ग्रामपंचायतींचे सरपंचाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच ग्राम विकास विभागाने दिनांक २१ सप्टेंबर २०१७ च्या पत्रान्वये नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षणाबाबत कार्यपध्दती नमूद केली आहे.

वरील सर्व बाबी लक्षात घेऊन, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३ ) मधील कलम १० अ पोटकलम (४) मधील अधिकारांचा वापर करुन, ३४ जिल्हयातील ३४० तालुक्यांमधील ७७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे याव्दारे घोषित करण्यात येत आहे. सदरच्या सार्वत्रिक निवडणूका मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील.

आदेश



१) परिशिष्ट १ मध्ये दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार३४० तालुक्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा.

२) निवडणुका असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/ घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही...
( आयोगाचे आचारसंहितेबाबतचे दि. १४/१०/२०१६ चे एकत्रित आदेश, दि.०६/०९/२०१७ चे अतिरिक्त आदेश व दिनांक १७/१२/२०२० चे पत्र )

३) या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे राबविण्यात यावी.

४) सन २०२२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४, दिनांक २० जानेवारी २०२२ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक किंवा पोटनिवडणूक कार्यक्रमांकरिता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिनांक हा ३१ डिसेंबर, २०२२ किंवा त्यापूर्वीचा असेल, त्याबाबतीत नामनिर्देशनपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यपत्र किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र सादर करण्याची गूभा उमेदवारांना दिली आहे.

(५)परिशिष्ट १ येथील निवडणुक कार्यक्रमानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदीया करीता सकाळी ७.३० ते दुपारी ३.००वा. पर्यंत) निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर एखादया ग्रामपंचायतींच्या निवडणूकी संदर्भात मा. न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या स्तरावर स्थगितीची कार्यवाही करुन आयोगाला त्वरीत कळविणे आवश्यक राहील. 

ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शी पध्दतीने पार पाडण्याच्या दृष्टीने 
आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या पूर्वतयारी आदेशातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. नवीनतम उपक्रम राबविण्यासंदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी.

आयोगाचे दिनांक ०७/११/२०२२ रोजी दिलेल्या निवडणूक पूर्वतयारी आदेशातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

सोबतच्या परिशिष्ट १ नुसार निवडणूक कार्यक्रम मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देण्यात येत आहे. तथापि निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी, पूर इ. नैसर्गिक आपत्ती निवडणूक असलेल्या क्षेत्रात उद्भवल्यास त्याबाबतचा अहवाल तात्काळ आयोगास सादर करण्यात

07 November 2022

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतसिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना(SOP)


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना  दिनांक 4 नोव्हेबर 2022 च्या शासन निर्णयानुसार देण्यात येत आहेत.



१. लाभधारकाची निवड :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

अ) अनुसूचित जाती 

ब) अनुसूचित जमाती

क) भटक्या जमाती

ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)

इ) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी फ) स्त्री कर्ता असलेली कुटुंबे

ग) शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे

ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी

आय) इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी

जे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम

२००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी

के) सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)

एल) अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)


२. लाभधारकाची पात्रता

अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.

ब) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,

(क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.

1. दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.

ड) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.

ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)

(फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.

(ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.


३. विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती

३.१ इच्छुक लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या "अर्ज पेटीत" टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.


अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : 

१) ७/१२ चा ऑनलाईन उतारा

२) ८ अ चा ऑनलाईन उतारा

३) जॉबकार्ड ची प्रत

४) सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा

५) सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र


३.२ "अर्ज पेटी" दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तरी त्यांनी ती करावी..


३.३ वरील प्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायतीस / ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील.


३.४ ग्रामपंचायत / ग्रामसभा मंजुरी : मनरेगाच्या कार्यपध्दती प्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीच्या मान्यतेने लाभार्थ्यांची निवड करता येते. योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या यादीस त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर ठेवण्यात यावे. गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात यावी.


३.५ लेबर बजेट :

पात्र लाभार्थ्यांचे सर्व अर्ज त्या वर्षाचे लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे. 


३.६ पूरक लेबर बजेट :

तसेच ज्या लाभार्थ्यांची नावे लेबर बजेटमध्ये समाविष्ट झाली नाही व सदर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत, अशा लाभार्थीना योजनेचा लाभ मिळण्याकरिता पूरक लेबर बजेट तयार करावे. त्याकरिता दिनांक १ डिसेंबर ते पुढील वर्षांचे १४ जुलै पर्यंत "अर्ज पेटीत" किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जांना त्या त्या महिन्यांचे पंचायत सभेत मान्यता द्यावी. त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेसमोर सदर यादीस प्रस्तुत करण्यात यावे.


३.७ सर्वसाधारणपणे दरवर्षी चार ग्रामसभा होतात. त्या सर्व ग्रामसभांमध्ये मनरेगाच्या अर्जातील कामांची मान्यता घेण्यात यावी. तथापि, मनरेगाअंतर्गत सर्व प्रकारची कामे मिळून १० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यावर या अर्जांना मान्यता देण्याकरिता विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. तथापि, एखादे सार्वजनिक काम महत्वाचे आणि तातडीचे वाटल्यास एका कामासाठी सुद्धा विशेष ग्रामसभा घेण्यात यावी.


३. ८ सर्वसाधारण परिस्थितीत ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आणि विशेष परिस्थितीत (शासनादेशाने ग्रामसभा घेण्यास बंदी असल्यास) ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यावर सदर कामास एका महिन्याच्या आत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात यावी.


३. ९ तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची व प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.


३.१० ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.


३.११ मनरेगा कायद्याच्या तरतूदीनुसार जिल्हा परिषदेने शेल्फवर कामे मंजूर करावयाचे आहेत. वरीलप्रमाणे प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त कामांना जिल्हा स्तरीय समितीच्या माध्यमातून शेल्फवर घेण्यात यावे. तथापि, यासाठी कार्योत्तर मंजूरी घेण्याचे प्रावधान ठेवण्यात येत आहे.


४. ग्रामपंचायतनिहाय विहीरीची कामे मंजूर करतांना विचारात घ्यावयाच्या बाबी


ग्रामपंचायतीमध्ये योजनेअंतर्गत साधारणतः प्रती वर्षी किती मजूर फुटकळ कामाची मागणी करतात, त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करुन पुढील वर्षाचे नियोजन प्रस्तावित करुन मंजूर करावे. विहिरीच्या कामांमध्ये मजूरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने विहिरीच्या कामांसोबत मजूरीप्रधान कामे उदा. भूसुधार, वृक्ष

लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजूरी व साहित्याचे ६०:४० प्रमाण राखणे शक्य होईल. त्याचप्रमाणे


४.१ विहिरीसाठी लाभधारक निवड करताना गावपातळीवर एका आर्थिक वर्षात मजूरी व साहित्याचे प्रमाण ६०:४० राखण्यात यावे.


४.२ अधिक विहिरींची मागणी असल्यास सुरु असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जातील तसतसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी. ४.३ या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी कितीही विहिरींचे कामे सुरु असू शकतात. यासंदर्भात लोकसंख्येनुसार विहीर मंजूरीची अट रद्द करण्यात येत आहे.


५. सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी


अ. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट २०१२ च्या कार्यसंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल, ट्यूबवेल अनुज्ञेय नाही. तथापी शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो २०११/प्र.क्र.११३ /रोहयो-१० अ, दिनांक १७ ऑक्टोबर, २०११ अन्वये विंधन विहिर (In Well Bore) अनुज्ञेय आहे.

ब. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेमध्ये (PMKSY) दिलेल्या उद्दिष्टानुसार राज्यात ३,८७,५०० विहिरी घेण्यास भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मान्यता दिलेली आहे. . त्यानुसार विहिर बांधण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत निहाय व तालुकानिहाय विहिरीसाठी लाभार्थ्यांची मागणी मान्य करण्यात यावी. तथापि, अद्ययावत भूजल मुल्यांकनानुसार यातील काही तालुके / गावांमध्ये विहिरी घेण्यास बंदी आल्यास तशी बंदी अंमलात येईल.

क. भूजल सर्वेक्षण यंत्रणा (GSDA) च्या व्याख्येप्रमाणे सेमीक्रिटीकल, क्रिटिकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रामध्ये फक्त समूह विहिरी हाती घेता येवू शकतात. असा समूह तयार करतांना एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समूह असावा. समुहातील शेतकऱ्यांनी करारनामा करून उपलब्ध होणारे पाणी योग्य प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत.

ड. सुरक्षित क्षेत्रात (Safe Zone) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरींची कामे हाती घेता येवू शकतात.

ई. क्रिटिकल सेमी क्रिटिकल आणि ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जल पुनर्भरण संरचनांचे कार्य घेण्यात यावे. हे कार्य सुनियोजित पद्धतीने झाल्यास असे क्षेत्र

सेफ झोनमध्ये परिवर्तित होतील. विविध झोन बाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा दर तीन वर्षांनी पाहणी करते. विशिष्ट प्रयत्नातून एखादा झोन आधीच सेफ झोन मध्ये परिवर्तित झाले असे वाटत असल्यास त्याबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या निदर्शनास आणून तीन वर्षे पूर्ण होण्याआधीही यामध्ये स्पष्टता आणता येईल.



६. सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे :

या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबंधित तांत्रिक सहाय्यकांनी विहीर स्थळ निश्चितीचे प्रमाणपत्र द्यावे. यासाठी सदर प्रमाणत्राव्यतिरिक्त इतर प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.


अ) विहिर कोठे खोदावी

१. दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३०से.मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.

 २. नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.

 ३. जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से.मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.

४. नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माली नसावी.

५. घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात.

६. नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु. रेती व गारगोट्या थर दिसून येते.

७. नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.

८. अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.


ब) विहीर कोठे खोदू नये

१. भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.

२. डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.

३. मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

४. मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.

(मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी / नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो)


क) विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४ (क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करुनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म बंडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांधावे जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.



7. आर्थिक मर्यादा :


अंदाजपत्रकासाठी संबंधित जिल्हयाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून विहिरींची मापे निश्चित करून घ्यावीत. सध्याच्या किमतीत झालेली सर्वसाधारण वाढ विचारात घेवून शासन निर्णय क्रमांक मग्रारो-२०१२/प्र.क्र.३०/रोहयो-१, दिनांक १७ डिसेंबर, २०१२ अधिक्रमीत करून शासन विहीरीच्या किमतीची कमाल मर्यादा रु.३.०० लाखावरुन रु. ४.०० लाख करीत आहे.


8. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहीरींबाबत :


शासन परिपत्रक दि. २१ ऑगस्ट, २०१४ च्या सिंचन विहिरींच्या मार्गदर्शक सूचनांन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींना मान्यता देण्यात आली होती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी अनुज्ञेय नसल्याने या शासन निर्णयान्वये सदर मान्यता रद्द करण्यात येत आहे. तथापि, याआधी सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पूर्ण करुन घेण्यात याव्यात. आणि त्यावरील व्यय यापूर्वी ज्या पद्धतीने करण्यात येत होते त्या पद्धतीने करण्यात यावे. तसेच, एका गावात एकापेक्षा जास्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे कार्य सुरु असल्यास त्याच्या देयकाची अदायगी शासनमान्यतेने करण्यात यावी.


9. कार्यान्वयीन यंत्रणा :


विहीरीच्या कामांना पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अधिकाऱ्यांनी तांत्रिक मान्यता द्यावी व सह कार्यक्रम अधिकारी तथा गटविकास अधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी. विहीरीची कामे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात यावी.


10. विहीर कामाच्या पूर्णत्वाचा कालावधी :


विहीरीच्या कामांना प्रशासकिय मान्यता दिल्यानंतर काम शक्य तेवढे लवकर पूर्ण करण्यात यावे. असे निदर्शनास आले आहे की, विहिरींची कामे चांगल्या गतीने केल्यास ४ महिन्यात पूर्ण होते. तथापि, पावसाळा ऋतू इत्यादी कारणाने काही वेळा हा कालावधी लांबू शकतो. त्यामुळे सलग दोन वर्षात विहीरींची कामे पूर्ण होणे अनिवार्य राहील. तथापि, काही अपवादात्मक परिस्थितीत जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेने सदर कालावधी तीन वर्षे असा करता येईल.

11.या (SOP) मानक ऑपरेटिंग प्रक्रियेने राज्यभरात शक्य तितक्या अधिक विहिरी खोदण्यासाठी सर्वांनी एकनिष्ठ होऊन कार्य करावे. यापुर्वीचे कोणतेही शासन आदेश या SOP पेक्षा वेगळे असल्यास आणि त्याने विहिर खोदण्याच्या कार्यास शिथिलता येत असल्यास ते सर्व आदेश या आदेशाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत. तसेच, कोणत्याही जिल्हा, तालुका किंवा अधिकारी यांनी या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेपेक्षा वेगळी प्रक्रिया अवलंबू नये.