27 July 2023

मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना

आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. या अनुषंगाने अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत मा. केंद्रीय कॅबिनेट सचिव यांचेद्वारे सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांची दि. २२.०७.२०१३ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेवून काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात व देशात मेरी मिट्टी मेरा देश' (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या, याबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत. या उपक्रमानुसार प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेणे अपेक्षित आहे. या अभियानात ग्रामपंचायती, पंचायत समित्या जिल्हा परिषदा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी योगदान देणे अभिप्रेत आहे.

या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


अ. ग्रामपंचायत स्तर

दिनांक ९ ते १४ ऑगस्ट २०२३ यादरम्यान कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करणे.

१) शिलाफलक :

गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर /शाळा/ ग्रामपंचायत इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी. (शिलाफलकाची डिझाईन सोबतच्या सादरीकरणामध्ये दिली आहे.) •शिलाफलकावर आझादी का अमृतमहोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा विजन २०४७ संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे (नावे उपलब्ध नसल्यास "मातृभूमिची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरीता बलिदान दिलेल्या वीरांना शतश: नमन । "असे सामान्य वाक्य लिहावे, ग्रामपंचायतचे

नाव, दिनांक याबाबी नमूद करायच्या आहेत. ) शिलाफलकमची निर्मिती मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावी.

शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यसाठी व

सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी.

शिलाफलकावर लिहिण्यासाठी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यसाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करून शिलाफलकाची उभारणी करण्यात यावी.
२) वसुधा वंदन

• यामध्ये गावातील योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका करण्यात यावी.

-यासाठी रोपे खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात यावा.या उपक्रमासाठी आवश्यक रोपे उपलब्धताबाबत खात्री करावी. 
३) स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन : ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा, (आर्मी, पोलीस दल), स्वातंत्र्यसैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान (शाल,बुके, शिफळ देवून) करण्यात यावा.

४) पंच प्रण ( शपथ घेणे

सोबतच्या सादरीकरणामध्ये दिल्याप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी (PRI),गावकऱ्यांनी पंच प्रण (शपथ) घेण्यात यावी.

• हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या
दिव्यांची पुरेशी व्यवस्था करावी, सदरील दिवे रास्तधान्य दुकानातही खरेदीसाठी उपलब्ध करून दयावेत.

(५) ध्वजारोहन कार्यक्रम: -गाव क्षेत्रातील (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इ.) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत

गायन व तिरंगा फडकविणे. संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी (PRI), युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करणे,

- या कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १-२ मूठ माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपवावी. - या सर्व उपक्रम राबविणेबाबत कृती आराखडा कार्यक्रमाआधी विशेष ग्रामसभा घेवून याबाबतचा ठराव करण्यात यावा.
-१५ ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे नियमित झेंडावंदन असेल.

ब. तालुका स्तर: 

दिनांक १६ ते २० ऑगस्ट २०२३ यादरम्यान पुढील उपक्रम आयोजित करणे.

(१) माती कलशामध्ये गोळा करणे

प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करावी. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटकरून किंवा रेडियमने लिहावे.

हा मातीचा कलश दिनांक २७ ते ३० ऑगस्ट २०२३ यादरम्यान मा. प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवून जाण्यास एका युवकाची निवड करावी. याकरीता नेहरू युवा केंद्र,

युवक कल्याण विभागाचे सहाय्य घ्यावे.
२) वसुधा वंदन

-यामध्ये तालुक्याचे योग्य ठिकाण निवडून वसुधा वंदन म्हणून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून

अमृतवाटिका करण्यात यावी. - यासाठी रोपे खरेदी, वृक्षारोपण कार्यक्रम याबाबतचा खर्च महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून

करण्यात यावा.

३) ध्वजारोहन कार्यक्रम

- तालुकास्तरावर (अमृत सरोवर शाळा/ पंचायतसमिती इ.) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन

राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविणे.

- संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व

नागरिक यांचा लोकसहभाग घेवून कार्यक्रम यशस्वी करणे.